Monday, June 8, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार….-आज दुपारची घटना….

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार….-आज दुपारची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- जंगलात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकरित्या हल्ला करताच गुराखी जागीच ठार झाला.सदरची घटना आज दिनांक- २० ऑक्टोंबर २०२३ रोजी मूल तालुक्यातील महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या जानाळा बीट कक्ष क्रमांक ५२३ मध्ये दुपारी ३ च्या सुमारास घडली.बंडू विठ्ठल भेंडारे वय ५८ वर्षे रा.कांतापेठ असे मृत गुराख्याचे नाव आहे.

मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडू विठ्ठल भेंडारे नेहमीप्रमाणे गुरे चराईसाठी गावा लगतच्या जंगल परिसरात गेला होता.जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने बंडूवर दुपारच्या सुमारास अचानक हल्ला चढवला.वाघाच्या हल्ल्यामुळे दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगल परिसराकडून गुरे गावाच्या दिशेने पळू लागली.त्यामुळे काही नागरिकांना संशय आल्याने नागरिकांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली.तो पर्यंत बंडू भेंडारे वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झालेला होता.सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल आर.जी.कुमरे,वनरक्षक यु.आर.गवई,पोलीस निरीक्षक सुमित परतेकी घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा झाल्यानंतर मृत्तदेह मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी,तर १२ प्रवासी किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पुणे येथून नागपूरच्या दिशेने निघालेल्या  एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊन ट्रॅव्हल्समधील तब्बल १५ जण गंभीर जखमी झाले,तर १२ जण किरकोळ...

वैनगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू; पाच जण थोडक्यात बचावले..

उद्रेक न्युज  भंडारा :-जिल्ह्याच्या करचखेडा येथील वैनगंगा नदी बेटावर एका खासगी बोटीद्वारे आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सात तरुणांपैकी परतीच्या वाटेवर असतांना नदीतील पाण्यात बोट उलटल्याने दोन...

आता विदर्भातील हत्तींची तयार होणार स्वतंत्र ओळख नोंदवही.. – वन विभागाच्या सहकार्याने हत्तींच्या हालचालींवर राहणार वैज्ञानिक पद्धतीने नजर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील...

नक्षलवादाच्या खात्म्यानंतर गडचिरोलीत विकासाचा नवा आराखडा.. – स्थानिक तरुणांचे कौशल्यविकास,पायाभूत सुविधा, वनहक्क आणि सेवा वितरणावर भर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांना मागे हटण्यास भाग पाडल्यानंतर आता त्या भागात निर्माण झालेली प्रशासकीय पोकळी नागरी प्रशासनाने प्रभावी सेवा,विकासकामे आणि जनसंपर्कातून भरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!