- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधिमंडळ परिसरात अतिशय धक्कादायक तितकीच लांच्छनास्पद घटना आज,गुरुवार १७ जुलै रोजी घडली.काल बुधवारी विधानभवनाच्या बाहेर गेटवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट)जितेंद्र आव्हाड यांच्यात जोरदार वाद झाला होता.वाद इतक्या टोकाला गेला होता की,गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती.विधिमंडळाचे मुंबईत सुरू असलेले पावसाळी अधिवेशन उद्या,शुक्रवार १८ जुलै रोजी संपणार आहे.विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी आज गुरुवारी सभागृहात मांडला.त्यामध्ये त्यांनी काल बुधवारी झालेला वाद,त्यानंतर आलेल्या धमक्यांसंदर्भात माहिती दिली.यानंतर थोड्याच वेळात विधानभवनाच्या परिसरात आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार वाद झाला.गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात वाद झाला.यांच्यामध्ये कालच वाद झाला होता.हे प्रकरण शिवीगाळ करण्यापर्यंत गेले होते.अश्यातच आज गुरुवारी यानंतर दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली.दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना यथेच्छ शिवीगाळ केली.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेले. विधान भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे घडलेल्या घटनेने संदर्भात अहवाल सादर केलेला आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आमदारांसोबत केवळ शासकीय स्वीय सहाय्यकाला परवानगी आहे.पण तरीही आमदार मंडळी त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत आणतात. विधानसभा सदस्य असलेल्या आमदारांकडून नियमांची पायमल्ली केली जाते,असे पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे. सर्वपक्षीय आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन विधिमंडळात येतात.बऱ्याचदा आमदारांच्या कार्यकर्त्यांकडे पासही नसतात.परवाना नसतांना ते अनेक ठिकाणी फिरत असतात.विधिमंडळात त्यांचा अगदी मुक्त संचार असतो.आमदारांच्या कार्यकर्त्यांचे विधिमंडळात फोटोसेशन चालते,अशा महत्त्वाच्या बाबी पोलिसांनी त्यांच्या अहवालात नमूद केल्या आहेत.आता या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय कारवाई करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Advertisement -

