- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली.गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातांमध्ये वाघांच्या मृत्यू बाबत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.अशातच बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावरील सिंदेवाही-आलेवाही रेल्वेस्थानकादरम्यान रक्सौल एक्स्प्रेसच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाला असून रेल्वे रुळाजवळील झाडीत मृत वाघ आढळून आला. घटनेबाबत वन विभागास माहिती होताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.जंगल परिसर लागून असलेल्या ठिकाणाहून रेल्वेचा वेग कमी असणे आवश्यक आहे; कारण की,वन्यप्राणी रेल्वे रूळ ओलांडताना जीव जाणे साहजिकच आहे.मात्र,यावर कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलण्यात येत नसल्याने अनुचित प्रकार घडत असतात.
- Advertisement -

