- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्याच्या इंजेवारी येथील शेत परिसरात रानटी हत्तींनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या उभ्या मका पिकांची नासधूस करून संपूर्ण मका पीक पायदळी तुडवल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.सदर घटनेची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांना मिळताच लगेच त्यांनी घटनास्थळी धाव घेत शेतातील नुकसानीची पाहणी करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसाभरपाईची देण्याची मागणी केली.
गेल्या ३ वर्षांपासून रानटी हत्ती गडचिरोली जिल्ह्यात भ्रमंती करीत आहेत.त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींनी जिल्ह्यातील जंगलांचा जणूकाही ताबाच घेतला असल्याचे दिसून येत आहे.
कधी गडचिरोली तालुका तर कधी कुरखेडा,देसाईगंज व इतर तालुक्यात रानटी हत्तींनी धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या शेतातील झोपडी,भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले आहे.अशातच काल,गुरुवारी १३ मार्चला रानटी हत्तींनी आरमोरी तालुक्यात प्रवेश करून इंजेवारी येथील शेतकऱ्यांच्या मका पिकांची नासधूस करून शेतातील पाईप लाईन फोडली.आमदार रामदास मसराम शेत बांधावर जाताच एका वयस्कर शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रुधाराचा बांधच फुटला होता.मसराम यांनी धीर देत वनाधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून तात्काळ पंचनामे करून नुकसाभरपाई देण्याची मागणी केली व रानटी हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले.प्रसंगी आमदार रामदास मसराम,आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,युवक कँग्रेस विधानसभा अध्यक्षकमलेश बारस्कर व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.
- Advertisement -

