उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीपूर्वी हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी माजी सरपंचांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. सरपंचांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री नायब सैनी यांनी त्यांच्या मानधनात वाढ केली आहे. इतकेच नव्हे तर नागरी संस्थांच्या प्रतिनिधींना मानधन आणि पेन्शनही जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, ४ जून २०१९ पासून माजी सरपंचांना दरमहा १५०० रुपये पेन्शन दिली जाईल. याशिवाय सरपंचांच्या मानधनात दीडपट वाढ करण्यात आली आहे.आता सरपंचांचे मानधन ३ हजार वरून ५ हजार रुपये झाले आहे.पंचांचे मानधन ६०० रुपयांवरून १६०० रुपये करण्यात आले आहे. त्याचवेळी सैनी यांनी नागरी संस्थांच्या प्रतिनिधींना भेटवस्तू दिल्या आहेत.आतापासून जिल्हा परिषद अध्यक्षांचे पेन्शन २ हजार रुपयांवरून ३ हजार रुपये करण्यात आले आहे.उपाध्यक्षांना १५०० रुपये मिळतील.याशिवाय पंचायत समिती सभापतींना दरमहा २२५० रुपये मानधन मिळणार आहे.

