Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजमाहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास केली जाते टाळाटाळ

माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास केली जाते टाळाटाळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत मागितल्या जाणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील जनमाहिती अधिकारी मागितलेली माहिती देण्यास ३० दिवसांचा कालावधी लोटूनही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.विहित मुदतीत माहिती दिली जात नसल्याने भ्रष्टाचाराला चालना मिळत असल्याचे चित्र हल्ली सर्वत्र दिसून येत आहे.

माहितीचा अधिकार कायदा १२ आक्टोंबर २००५ रोजी अंमलात आणला गेला. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्रशासनातील दोष,उणिवा,गैर प्रकार उघड करण्यास मदत होते. माहितीचा अधिकार एकमेव असा कायदा आहे कि लोकप्रशासनाने पाळायचा असून त्यावर जनतेची नजर असते.कायद्यामुळे संपूर्ण भ्रट्टाचार संपणार नसून भ्रष्टाचाराचे काही प्रमाण कमी होणार आहे.कायद्यामुळे शासनाचा जनतेशी संबंध येतो.शासकीय तसेच खासगी कार्यालयाच्या कामकाजात पारदर्शकता यावी व सामान्य नागरिकांना कामकाजाची माहिती व्हावी व अधिकृत कागदपत्रे मिळाविता याच उद्देषाने माहितीचा अधिकार कायदा पारित करण्यात आला.मात्र सध्या स्थितीत जनमाहिती अधिकारी ३० दिवस होऊन सुद्धा माहिती देत नसल्याचे निदर्शनास येत आहे.एवढा कालावधी मिळूनही माहिती दिली जात नसल्याने भ्रष्टाचार कमी न होता वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.शासन स्तरावरून कितीही कठोर कायदे तयार केली तरी काही भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यांना याचे सुतक ना बारसा असे झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!