Wednesday, April 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमारले जाण्याच्या भीतीने १५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

मारले जाण्याच्या भीतीने १५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षकांच्या वाढत्या कारवायांमुळे नक्षलवादी धास्तावले असून मारले जाण्याच्या भीतीने आज,बुधवार २६ मार्च रोजी
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ९ तर दंतेवाडात ६ नक्षलींनी सुरक्षा दलांपुढे आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या १५ ही नक्षलवाद्यांवर शासनाने नक्षली बंडू मलकावर ८ लाख तर यातील काहींवर ५ लाख व २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.त्यामुळे नक्षली मरण्यापेक्षा शरणागती बरी,असा पावित्रा घेऊ लागले आहेत.छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ‘पूना नर्कोम’ तर दंतेवाडा जिल्ह्यात ‘लोन वर्राटू’ नावाने नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा पथकांची मोहीम सुरू आहे.अशातच आत्मसमर्पण केलेल्या ९ नक्षलवाद्यांवर एकूण २६ लाख रुपये तर ६ नक्षलवाद्यांवर एकूण १३ लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते.दंतेवाडात आत्मसमर्पण केलेल्या नक्षालींमध्ये दोन महिला व चार पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!