- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात होऊन एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला,तर १७ जण जखमी झाल्याची घटना आज,रविवार १५ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावाजवळ घडली.भूषण विजय दोडके वय १७ वर्षे, रा.पाटाळा, ता.भद्रावती,जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.घटना घडताच सर्व जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,यातील १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आज महाशिवरात्री असल्याने अनेक भाविक भक्त शिवाची पूजा अर्चना करण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात गेले होते.अश्याच प्रकारे पाटाळा परिसरातील शिवभक्त एमएच ३४ बी झेड ९४७८ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्रिशूल घेऊन दर्शनासाठी गेले होते.दर्शन करून परत येत असतांना सर्वजण पाटाळा गावाजवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पलटी झाला. यात १७ वर्षीय तरुण वाहनाखाली दबल्याने जागीच मृत पावला.तर १७ भाविक जखमी झाले.यात पाच जण किरकोळ जखमी झालेत.किरकोळ जखमींमध्ये प्रवीण आवारी,गुरुवेश राजेश जाधव वय १४ वर्षे,ओंकार शिवशंकर मांढरे वय ९ वर्षे,प्रतीक पारखी आणि रोहित झाडे यांचा समावेश आहे.यांचेवर वरोरा रुग्णालयात उपचार करण्यात आले.तर गंभीर जखमींमध्ये नानाजी मरस्कोल्हे वय ७० वर्षे,गणेश खापणे वय ४० वर्षे,मारोती शिवरकर वय ४५ वर्षे,विनोद गौरकर वय ५० वर्षे,रोशन माडवे वय १७ वर्षे,मारोती बदखल वय ५० वर्षे,सोहम भोयर वय १६ वर्षे,मयूर वनशिंगे वय १६ वर्षे,राजू किसन शिवरकर वय ४२ वर्षे,राजू जाधव वय ४० वर्षे,मंथन डाहूले वय १३ वर्षे,लकी भडके वय २० वर्षे अशी जखमींची नावे असून यांचेवर चंद्रपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेने पाटाळा व राळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
- Advertisement -

