उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- पूर्वी जिकडे बघावे तिकडे पुरुष प्रधान प्रणाली दिसून यायची; मात्र हल्ली काळानुरूप परिस्थिती बदलत चालली आहे.अशातच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जरी बघितले तरी असे गाव सापडणार नसल्याचे हल्ली दिसून येत आहे. केवळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सोडले तर गावात प्रथम नागरिक म्हटल्या जाणाऱ्या सरपंचा महिला सोबतच पोलीस पाटील,ग्रामसेविका,तलाठी तसेच वनरक्षक महिला असून याच्यात आणखी चार ग्रामपंचायत सदस्य महिलांचा भर पडून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावात जणूकाही महिला राज निर्माण झाले की काय? असे दिसून येत आहे.
सध्याच्या घडीला ‘साहेब’ म्हणण्यापेक्षा कित्तेक क्षेत्रात ‘मॅडम’ म्हणण्याचा ट्रेण्ड(कल) वाढलेला दिसून येतो आहे.महिला सशक्तीकरण करणे ही काळाची गरज जरी बनली असली तरीही आजच्या आधुनिक, तंत्रज्ञानाच्या युगात महिला राज कित्तेक क्षेत्रात निर्माण झालेले दिसून येत आहे.याचेच साधे उदाहरण गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावातील आहे.पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला- खांदा लावून जरी महिला वर्ग धजावित असल्या तरीही ही केवळ बतावणी केली जात असल्याने घरातील अनेक पुरुष मंडळी महिला सशक्तीकरण यांच्या आळ येतांना दिसून येत आहेत.काही गावांमध्ये सरपंच महिला जरी बनल्या असतील तरीही अनेकांचे प्रतिनिधित्व नवरोबा करतांना दिसून येतात.महत्वाचे म्हणजे ज्यांना काही कळत नाही; अशांना कां बर? तुम्ही प्रतिनिधित्व तसेच उमेदवार ठरविता?असा सवाल उपस्थित केला जातो आहे.अशांना धडा शिकविणार कोण? असे विचार अनेकांच्या मनात घर सोडून जात आहे.अशातच एक ना धड भाराभर चिंध्या होतांना दिसून येत आहे. महिला सशक्तीकरण ही केवळ बतावणी शासनाकडून केली जात नाही.तर यासाठी महिला वार्गांनी स्वतः पुढाकार घेऊन अनेकांच्या नाकावर लिंबू पिळून स्वतःच्या भुवया उंचावणे गरजेचे आहे.अन्यथा चूल आणि मूल या पलीकडे कुणीही जाणार नसल्याचे सुर निघू लागले आहेत.

