उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा २९ जून रोजी जिंकली.या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनी टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.यासाठी आता महाराष्ट्र शासनाकडून भारतीय संघाला मोठे बक्षीस देण्यात येत आहे.
या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला.यानंतर आज,शुक्रवारी महाराष्ट्र सरकारकडून भारतीय संघाचे कौतुक करण्यात आले.
याबरोबरच टी -२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडू रोहित शर्मा,शिवम दुबे,सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे व मसाज थेरपिस्ट अरुण कानडे यांचाही महाराष्ट्र शासनाकडून सत्कार करण्यात आला.
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर विधान भवनातही या खेळाडूचे आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचा गौरव सोहळा पार पडला.दरम्यान,यापूर्वीच महाराष्ट्राच्या चारही खेळाडूंना १ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली होती.यानंतर आता विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण भारतीय संघासाठी ११ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. त्याचबरोबर आगामी काळात नव्या स्टेडियमसाठी जमीनीची वैगरे गरज भासल्यास त्यासाठीही मदतीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

