Tuesday, June 23, 2026
Homeमुंबईभारतीय क्रिकेट संघासाठी ११ कोटींचे महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस…

भारतीय क्रिकेट संघासाठी ११ कोटींचे महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा २९ जून रोजी जिंकली.या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनी टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.यासाठी आता महाराष्ट्र शासनाकडून भारतीय संघाला मोठे बक्षीस देण्यात येत आहे.

या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला.यानंतर आज,शुक्रवारी महाराष्ट्र सरकारकडून भारतीय संघाचे कौतुक करण्यात आले.

याबरोबरच टी -२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडू रोहित शर्मा,शिवम दुबे,सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे व मसाज थेरपिस्ट अरुण कानडे यांचाही महाराष्ट्र शासनाकडून सत्कार करण्यात आला.

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर विधान भवनातही या खेळाडूचे आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचा गौरव सोहळा पार पडला.दरम्यान,यापूर्वीच महाराष्ट्राच्या चारही खेळाडूंना १ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली होती.यानंतर आता विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण भारतीय संघासाठी ११ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. त्याचबरोबर आगामी काळात नव्या स्टेडियमसाठी जमीनीची वैगरे गरज भासल्यास त्यासाठीही मदतीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!