Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजफरी जंगल परिसरात बैलाची शिकार; वाघ वा बिबट्या संभ्रम झाले निर्माण - देसाईगंज...

फरी जंगल परिसरात बैलाची शिकार; वाघ वा बिबट्या संभ्रम झाले निर्माण – देसाईगंज तालुक्यातील घटना; वनक्षेत्र सहाय्यक कऱ्हाडे यांनी घटनास्थळी घेतली धाव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील फरी जंगल परिसरात एका बैलाची शिकार झाली असल्याची घटना आज १७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.मात्र नेमकी शिकार वाघाने केली वा बिबट्याने केली; कळू न शकल्याने संभ्रम निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की,काल १६ मार्च रोजी फरी गावातील गुराखी देवचंद पेंदाम हे नेहमी प्रमाणे गायी – ढोरे चराई करीता फरी जंगल परिसरात गेले होते.मात्र त्याच गावातील पांडुरंग आसाराम शेंडे यांच्या मालकीचे बैल घरी परत आले नसल्याने त्यांनी व गावातील नागरिकांनी शोधाशोध केला.मात्र त्यादिवशी त्यांना बैलाचा थांगपत्ता लागलेला नाही.परत पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज १७ मार्च रोजी फरी जंगल परिसरात शोधाशोध केल्याने आज दुपारच्या सुमारास बैलाची शिकार झाले असल्याचे आढळून आले.

फरी गावातील पांडुरंग आसाराम शेंडे यांच्या मालकीचे असलेल्या बैलाची शिकार झाल्याची माहिती वनक्षेत्र सहाय्यक के.वाय.कऱ्हाडे यांना देण्यात आली.माहिती मिळताच कऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.घटनास्थळावरून बैलाची शिकार वाघाने केली वा बिबट्याने केली कळू न शकल्याने सदर घटनास्थळी कॅमेरा लावून छायाचित्रावरून कळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.वनक्षेत्र सहाय्यक कऱ्हाडे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून घटनास्थळावरून पाहणी केल्यानंतर वाघाने शिकार केली असावी; असा अंदाज वर्तविण्यात येत असल्याची माहिती दिली.तसेच फरी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी जंगल परिसरात जाण्याचे टाळावे व सतर्कता बाळगण्याचे आवाहन कऱ्हाडे यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!