Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजपीक पंचनामे झाले,याद्याही तयार झाल्या; मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळेना…!-देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांची...

पीक पंचनामे झाले,याद्याही तयार झाल्या; मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळेना…!-देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आजही कायम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- मागील वर्षी ऑगष्ट, सप्टेंबर महिन्यात कृत्रिमरित्या वैनगंगा नदीला आलेल्या पुराने  शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत धान पिकाची नासाडी झाली.त्यानंतर पंचनामेही झाले; याद्याही तयार झाल्या; परंतु अटी व शर्तीच्या कचाट्यात नऊ महिन्यांचा काळ लोटला असला तरी देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,विर्शि, आमगाव,सावंगी व इतर गावातील पूरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळालेला नाही.

अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीनांही मदतीची हाक दिली; पण आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही.ऑगष्ट,सप्टेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टी झाली होती. सततच्या पावसामुळे नदी,नाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील बऱ्याच गावासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून धान पिकासह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या बाबीला आता ९ महिन्यांचा कालावधी निघूनही त्यांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे पूर पीडित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आजही कायम आहे.शासन-प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी अनेकांनी केली होती.मात्र,त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.पुरामुळे गर्भावस्थेत असलेले धानाचे पीक पूर्णतः उद्धवस्त झाले.जवळपास ७६४.०३ हेक्टर क्षेत्रातील धानाची नासाडी झाली होती.याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसला. अतिवृष्टी झाल्याने धरणातील पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आले होते.त्यामुळे मोठा पूर आला. पुरामुळे अनेक गावांतील शेतात पाणी शिरून खरीप हंगामातील धानासह इतर पिकांचे नुकसान झाले. तसेच धानावर गढूळ पाणी व धान पाखर झाल्याने मोठे नुकसान झाले.नुकसान होऊनही भरपाई केव्हा मिळणार? याकडे शेतकरी बांधव टक लावून वाट बघत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!