- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांत मागील काही महिन्यांपासून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पाऊस पडते तासभर आणि लाईट जाते रातभर,अशी स्थिती नियमित असतांना याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कर्तव्यात हयगय करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कांग्रेसचे नेते लिलाधर भर्रे यांनी केली आहे.
भर्रे यांनी म्हटले की,मागील काही महिन्यांपासून अधुन-मधुन पाऊस होत असल्याने वारंवार लाईट जाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.दरम्यान अलिकडे गोरगरिबांना केरोसिनही मिळणे दुरापास्त झाल्याने घरात दिवा जाळणेही कठीण झाले असतांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागत आहे.विशेषतः होत असलेल्या पावसामुळे अनेकदा साप,विंचु तसेच विषारी किड्यांच्या दंशाने अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच हलकासा पाऊस जरी पडला तरीही ग्रामीण भागासह शहरी भागात वारंवार खंडित होणाऱ्या विज पुरवठ्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने एकुणच महावितरणचा भोंगळ कारभार पुरता चव्हाट्यावर येऊ लागला आहे.दरम्यान,याबाबत देसाईगंज येथील महावितरण कंपनीच्या शाखा अभियंता तसेच लाईमन यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने याबाबत कुणाकडे दाद मागावी?असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.वारंवार खंडित होत असलेल्या विज पुरवठ्यामुळे संपूर्ण गाव अंधकारमय होऊन कोणत्याही क्षणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही,करिता वरिष्ठांनी या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन स्थानिक शाखा अभियंते व संबंधित कर्मचारी यांच्या बेलगाम वृत्तीला आळा घालण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलत कर्तव्यात हयगय करणाऱ्या संबंधीतावर कायदेशीर कारवाई करून वारंवार विज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी; अन्यथा कांग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे भर्रे यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -

