Wednesday, April 15, 2026
Homeचंद्रपूरनदीच्या पुलावरून कोसळला ट्रक; चालकाचा मृत्यू..!

नदीच्या पुलावरून कोसळला ट्रक; चालकाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्घूस शहराजवळील
 बेलोरा पुलावरून अनियंत्रित झालेला ट्रक थेट ८० फूट खोल वर्धा नदी पात्रात कोसळल्याची घटना आज,शुक्रवार १ ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली.यात १८ चाकी ट्रकचा समोरील भाग चक्काचूर होऊन चालक केबिनमध्येच अडकून राहिला.प्रशासनाने चालकास वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र,त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. राजा यादव वय ३९ वर्षे रा.शास्त्री नगर,घुग्घूस असे अपघातात मृत पावलेल्या चालकाचे नाव आहे.
एमएच-३४ बी झेड १४०२ क्रमांकाचा १८ चाकी मालवाहू ट्रक आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास
वेकोलीच्या WCL नायगाव खाणीत कोळसा भरण्यासाठी जात होता.जात असतांना पुलावर एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा  ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक थेट पुलावरील रेलिंग तोडून वर्धा नदीत कोसळला.अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत याबाबत प्रशासनास माहिती दिली.काही वेळातच मोठ्या संख्येने घटनास्थळी नागरिक गोळा झाले.वेकोलि प्रशासन घटनास्थळी गॅस कटर,हायड्रा मशीन,ऑक्सिजन मशीन, व्हेंटिलेटर,डॉक्टर इत्यादींना बोलावून चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते.शिरपूर पोलिस आणि घुघुस पोलिसही केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.घटनेला चार तासांहून अधिक काळ लोटून ट्रक चालक राजा यादव केबिनमध्ये अडकून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत श्वास घेत होता.जवळपास पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर चालक राजा यादव याला बाहेर काढण्यात यश आले.तोपर्यंत तो गंभीर जखमी अवस्थेत होता.राजा यादव याला तातडीने घुग्घूस येथील राजीव रतन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरपूरचे पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी वणी नगर परिषदेतून स्पायडर कटर मशीन बोलावून केबिन कापून चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला.पण चालकाने अखेरचा श्वास घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!