- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-येत्या विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची(शरदचंद्र पवार गट)भूमिका,पक्ष वाढ,सर्वसामान्य जनतेची कामे,विविध सेल मधील पदाधिकाऱ्यांची निवड व इतर बाबींवर आज,१६ ऑगस्टला दुपारच्या सुमारास देसाईगंज येथील विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

बैठकीपूर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.राकाँपाचे(शरदचंद्र पवार गट)देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आर.आर.पाटील यांच्या जीवनपटलावर प्रकाश टाकत आढावा बैठक सुरू करण्यात आली.बैठकीत ज्यांचे पक्षचिन्ह व ज्यासाठी जीवाचे रान करून ज्यांनी पक्ष वाढीचे काम केलेत; अशांना विसरून पक्ष फुटीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकविण्याचे काम जनताच करीत आहे.चिन्ह बदलले तरीही राज्याच्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ खासदार निवडून आले असल्याने जनतेचा कौल आणि शरदचंद्र पवार यांच्याशी जनतेची नाळ जुळल्या गेलेली आहे; असे मत बैठकी प्रसंगी व्यक्त करण्यात आले.सभेमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी पुर्ण ताकतीने उतरावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमप्रकाश शर्मा,देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके,शहराध्यक्ष अशोक माडावार,आरमोरी विधानसभा निरीक्षक खेमराज परशुरामकर,ओ.बी.सी.सेलचे तालुकाध्यक्ष वसंतराव गोंगल,अल्पसंख्यांकचे तालुकाध्यक्ष सहाबुद्दीन पठाण, तालुका उपाध्यक्ष रोशन शेंडे,विलासराव पुस्तोडे,डाकराम वाघमारे,हंसराज लांडगे,बुद्धघोष मेश्राम,शरद राऊत,अरुण मेश्राम,दीपक सहारे,प्रदीप बगमारे, हरिदास बगमारे,आशिष गेडाम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुलाराम राखडे,शुभम मेश्राम, भास्कर वाटकर,नामदेव मेश्राम,अविनाश राघोर्ते,हितेंद्र गजघाटे,पुष्पाताई सुरकार,कल्पना वासनिक,संगीता भानारकर,निराशा गेडाम,ताईरा बेगम पठाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisement -

