Sunday, May 31, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात जंगली हत्तींचा धुडगूस; पिकांचे केले मोठे नुकसान.. -आमदार रामदास मसराम...

देसाईगंज तालुक्यात जंगली हत्तींचा धुडगूस; पिकांचे केले मोठे नुकसान.. -आमदार रामदास मसराम शेत बांधावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गेल्या अनेक वर्षांपासून  जंगली हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यात आसरा घेतल्याचे चित्र आहे.जिल्ह्याच्या चहूबाजूंनी धुडगूस घालणाऱ्या जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या पिंपळगाव-हलबी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.रविवारच्या रात्री शेतात शिरलेल्या हत्तींनी धान,मका व इतर पिकांची नासधूस केल्याने शेतकरी बांधव मेटाकुटीला आले आहे. त्यातच,परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच आज,सोमवार २ मार्च रोजी आमदार रामदास मसराम यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पाहणी केली.यावेळी त्यांनी वन विभागासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाईची तजवीज विना विलंब तात्काळ याबाबत कार्यवाही करावी,” असे उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केली.दरम्यान,वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.प्रसंगी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक तसेच वन परिक्षेत्र अधिकारी यावेळी उपस्थित होते.ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
यावेळी देसाईगंजचे माजी सभापती परसराम टिकले, देसाईगंज काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, परशुराम ठाकरे,भुमेश्वर शिंगाडे,सदानंद दोनाडकर,संदीप धोटे,रोशन मेश्राम,गजेंद्र नाईक,बंडू घरत,देवानंद भोयर, जितेंद्र भोयर,उद्धव घरत,लीलाधर दोनाडकर,रमेश भोयर, हिरा बालापुरे,हेमराज नाकतोडे,सुरेश बुल्ले,श्रावण पत्रे, कुसन बालापुरे,तीमा बालापुरे,प्रफुल धोटे,नीलकंठ राऊत, सुरज पारधी, रितेश गाडगे,मनोहर बुल्ले,टिकाराम धोटे, काशिनाथ धोटे,नीलकंठ भोयर,नेताजी मिसार,प्रभुनाथ कवासे, आनंदराव नाईक,नामदेव नाईक,कुशाल नाईक, आसाराम प्रधान,राजेंद्र राऊत,लिलाबाई प्रधान, हिराजी बुल्ले,प्रेमचंद बुल्ले,सुरज बुल्ले,यादव मेश्राम,केशव मेश्राम,रत्नाकर राऊत,गिरीधर चूलपार,शिशुपाल कमल, महेश राऊत,मुखर्जी राऊत,हिरालाल प्रधान यांचेसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!