- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद क्षेत्रातील गांधी वार्डात समस्यांचा डोंगर उभा असून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वार्डात मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था,तुटलेले कलवट तसेच रस्त्यांवर पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने देसाईगंज वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रा.अशोक मेश्राम यांचेसह पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी करून रस्ते,नाले सफाई,तुटलेले कलवट व इतर समस्या नगर परिषदेने तात्काळ मार्गी लावण्याची मागणी प्रा.अशोक मेश्राम यांनी केली आहे.
देसाईगंज शहरातील गांधीवार्ड हा सुशिक्षीत तसेच शासकिय नौकरदार बहुल नागरिकांचा भाग म्हणून ओळखला जातो.या भागातील वास्तव्यास असणारे जास्तीत जास्त नागरिक वेळेवर कराचा भरणा तसेच इतर बांधकाम शुल्क भरून नगर परिषदेस सहकार्य करीत असतात.मात्र,याच नागरिकांना नगर परिषदे मार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांपासुन वंचित रहावे लागत आहे.सदरची बाब योग्य नसून रस्त्यांवर पडलेल्या मोठ-मोठ्या भगदाडांमुळे वार्डात अनेकजण अपघात होऊन जखमी झालेत.रस्ते खड्डेमय होऊन त्यात पावसाचे पाणी साचत असते.त्यामुळे देसाईगंज नगर परिषद प्रशासनाने तातडीने समस्यांचे निराकरण करावे,अशी मागणी प्रा.अशोक मेश्राम यांनी केली आहे.गांधी वार्डातील समस्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करतांना नगर परिषदेचे बांधकाम अभियंता सौरभ नंदनवार,नसिम पठान,प्रा.प्रकाश बारसागडे,बंडु सिडाम, तारकेश्वर मैंद,राजरतन मेश्राम यांचेसह शहरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -

