उद्रेक न्युज वृत्त :-उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.या वर्षापासून गणेश उत्सव ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. अश्यातच मागील आठवड्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत राज्यातील विविध भागात हाहाकार माजवत शेती,घरे व इतर नुकसान करून सोडले होते.त्यातच आता भारतीय हवामान खात्याकडून आजपासून पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पाण्याच्या कर्दनकाळात सापडणार की काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचे सांगितले आहे.काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम असणार आहे.आज,मंगळवार २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने राज्यभर पुन्हा एकदा पावसाचा जोरदार खेळ पाहायला मिळणार आहे.
आजपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

