- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून मनाई करण्यात आली असून नवी मुंबईच्या खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल,असे मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेत निर्देश दिले आहेत.मात्र,मुंबईसाठी आम्ही रवाना होणारच,असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला असून मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले व आज,गुरुवार २८ ऑगस्ट रोजी ते पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले.अश्यातच पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे एक दुःखद घटना घडली असून एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे.सतीश ज्ञानोबा देशमुख वय ४४ वर्षे,रा.वरगाव,ता.केज,जि.बीड असे मृत पावलेल्या आंदोलकाचे नाव असून सतीश देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक होते.दोन वर्षांपासून प्रत्येक आंदोलात सतीश देशमुख हिरीरीने सहभागी व्हायचे. मनोज जरांगे पाटील हे हजारो मराठा कार्यकर्त्यांसह जुन्नर मुक्कामी होते.आज सकाळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता.मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी माध्यमांशी संवाद साधून ते मुंबईकडे रवाना होणार तोच दुःखद घटना घडली.घटनेवर जरांगे पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे.
- Advertisement -

