- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल नुकतेच जाहीर करण्यात आले असून येत्या पुढील महिन्याच्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत.दिनांक- १५ ऑक्टोंबरला मंगळवारी आचारसंहिता घोषित होताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून गल्ली-बोळात तसेच चावडीवर बसणाऱ्या नागरिकांच्या निवडणुकीसंबंधात विविध चर्चांना उधाण येऊ लागले आहे.अशातच चर्चेअंतर्गतच आरमोरी विधानसभेची तिकीट कोणाला मिळेल गा भाऊ? असा सूर उमटतांना दिसून येत आहे.
आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी विविध पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी मीच विधानसभेचा उमेदवार म्हणून प्रचाराला सुरुवात केली होती.विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी विविध सण उत्सवांच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावून आपणच उमेदवार असल्याचे भासविले होते.दरम्यान,मंगळवारपासून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली.त्यानुसार मंगळवारी रात्रीपर्यंत आरमोरी विधानसभा क्षेत्रात असलेल्या पाचही तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांचे होर्डिंग्ज काढण्यात आले.तथापि,सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असून बहुतांश नागरिक शेतशिवारात तर काही नागरिक गावातील पान टपरी,चौका-चौकात चावडीवर बसल्याचे दिसून येतात.आता निवडणुकीची उमेदवारी कोणत्या पक्षाकडून कोणाला मिळते व कोण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहणार,याविषयीच्या चर्चांना ऊत आला आहे.अशातच आरमोरी विधानसभा क्षेत्रात एकट्या प्रतिस्पर्धीने सर्वांची डोकेदुखी वाढवली असल्याने ‘त्यांना’ तिकीट नको मिळो रे देवा..! यासाठी विरोधकांचा आटापिटा सुरू झाला आहे. जुन्याच उमेदवारांना संधी मिळावी व आपले काम फत्ते व्हावे; यासाठी विरोधकांकडून कसोशीने प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
- Advertisement -

