उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावातील एका घरगुती वादावरून उद्भवलेल्या तक्रारीवरून अतीतात्काळ व जलद गतीने इतर प्रकरणात ११२ वरील वाहनास पाचारण केले असता,मुळ तक्रारीचे निराकरण न करताच ११२ वरील वाहन पो-बारा करून,ज्या व्यक्तीने तक्रार केली; अशाच व्यक्तीस नाहक त्रास देऊन,तू किती मोठा पत्रकार आहेस वा तुझी किती युनियन आहे….ते बघू म्हणून…धमकीवजा बोलणी..करणारे ‘ते’ पोलीस विभागातील कर्मचारी कोण? सदरची घटना दिनांक- ९ एप्रिल रोजी रात्री १२ वाजून ११ मिनिटांनी घडली असल्याने याचे नवल वाटत आहे.
कोण? व किती? तांदळाने धुतला आहे.घरगुती प्रकरणे तुमच्या घरी नाहीत काय? तुम्ही घरगुती वादावर कसा पडदा टाकताय; हे स्वतः आपल्याकडे बघणे महत्वाचे आहे.इतरांकडे एक बोट दाखविण्यापेक्षा चार बोट आपल्याकडे असतात; हेही तितकेच खरे आहे.त्यामुळे ‘अतिशहाणा त्याचा बैल रिकामा’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नसल्याने ‘तो’ म्हणतोय की,तू किती मोठा पत्रकार आहेस वा तुझी किती युनियन आहे….ते बघू म्हणून…धमकीवजा बोलणी..करून आपली बाजू मांडण्याचा ‘त्या’ कार्यकर्त्याने प्रयत्न केला आहे.याबाबत न्यायालयात प्रकरण वाढणार असून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठविण्यात येणार आहे व सर्वांचे पितळ उघडे पडणार असल्याची चर्चा उघडकीस येऊ लागली आहे.

