Tuesday, July 7, 2026
Homeभंडाराट्रॅक्टर दुसऱ्याचा,परवाना एकाचा अन् अधिकाऱ्यांची होतेय चांदी -प्रकरण मातीमिश्रित रेती तस्करीचे 

ट्रॅक्टर दुसऱ्याचा,परवाना एकाचा अन् अधिकाऱ्यांची होतेय चांदी -प्रकरण मातीमिश्रित रेती तस्करीचे 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- मातीमिश्रित परवानाच्या नावाखाली दर्जेदार रेतीचा उपसा हे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे. उल्लेखनीय म्हणजे लाखांदूर तालुक्यात परवाना एकाचा ट्रॅक्टर दुसऱ्याचे तर यात अधिकाऱ्यांची चांदी होत आहे.मलाई लाटण्यासाठी बांधलेली चॅनेल उघडपणे आपले काम करीत आहे.

भंडारा जिल्ह्याला वैनगंगासह तिच्या उपनद्यांमध्ये रेतीचे वरदान लाभले आहे.रेती घाटांची लिलाव प्रक्रिया अजूनही प्रथम टप्प्यातही पोहोचलेली नाही. नाही. जिल्ह्यातील ५४ पेक्षा जास्त रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. त्यातच आता मातीमिश्रित रेती वाहतुकीच्या नावावर रेती तस्करीचे गौडबंगाल केले जात आहे.चांगलेच मलाईचे साधन असल्याने अधिकाऱ्यांवर पैशांची बरसात केली जात नसावी तर नवलच! अशीही चर्चालाखांदूर असो की पवनी, मोहाडी की तुमसर, महसूल प्रशासनाच्या संगनमताशिवाय कुठलेही गैरकृत्य होत नसल्याचे बोलके चित्र आहे.पवनी तालुक्यातील इटगाव रेतीघाटाचीही हीच अवस्था आहे.खुद्द लाखांदूर तालुक्यात रेती तस्करीचा गोरखधंदा फुलत असताना जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष कसे काय? हा मोठा यक्ष प्रश्न आहे. गौण खनिजाची काळी कमाई वाटून खाल्ली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!