Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर पोलीस भरती; १९ जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू..-उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या...

चंद्रपूर पोलीस भरती; १९ जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू..-उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये-पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चंद्रपूर पोलिस दलातील १३७ पोलिस शिपाई व ९ बॅण्ड मॅनच्या पदासाठी १९ जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू होणार आहे;अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली.विशेष बाब म्हणजे यंदा पोलिस भरतीची प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.पोलिस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पावसाची शक्यता बघता उमेदवारांची शारीरिक चाचणी जिल्हा क्रीडा संकुलात होईल. तत्पूर्वी उमेदवाराची उंची व छातीचे मोजमाप केले जाईल. त्यांची कागदपत्रे तपासल्यांनंतर त्यांना आत प्रवेश दिला जाईल.त्यांनतर शारीरिक चाचणीमध्ये पुरुषाच्या १०० मीटर,१६०० मीटर व महिलांची १००,८०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल.

जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर उमेदवारांना स्पोर्ट शूज वापरण्यास मुभा देण्यात येईल.पोलिस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी; यासाठी RFID पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होणार असून उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडता स्वतः गुणवत्ता सिद्ध करीत या प्रक्रियेत सहभाग घ्यावा; असे आवाहन मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रियेत उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करणार नाही; असे हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेतले जाणार आहे.या आदेशाचे पालन न केल्यास उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.भरती प्रक्रियेसाठी काही उमेदवार १ किंवा २ दिवसापूर्वी दाखल होतात.त्यांना उघड्यावर कुठेही रहावे लागू नये; यासाठी त्यांची व्यवस्था पोलिस मुख्यालय येथील ड्रील शेडमध्ये करण्यात आली आहे.

बाहेरील किंवा इतर कर्मचारी उमेदवारांना पोलिस दलात नोकरी लावून देत असल्याचे आमिष देत असतील तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करावी; असे आवाहन मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.महिनाभर चालणाऱ्या या भरती प्रक्रियेदरम्यान पावसामुळे व्यत्यय आल्यास उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख कळविण्यात येईल; असेही सांगण्यात आले.पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू उपस्थित होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!