Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर पोलीस भरती; १९ जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू..-उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या...

चंद्रपूर पोलीस भरती; १९ जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू..-उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये-पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चंद्रपूर पोलिस दलातील १३७ पोलिस शिपाई व ९ बॅण्ड मॅनच्या पदासाठी १९ जूनपासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू होणार आहे;अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली.विशेष बाब म्हणजे यंदा पोलिस भरतीची प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.पोलिस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पावसाची शक्यता बघता उमेदवारांची शारीरिक चाचणी जिल्हा क्रीडा संकुलात होईल. तत्पूर्वी उमेदवाराची उंची व छातीचे मोजमाप केले जाईल. त्यांची कागदपत्रे तपासल्यांनंतर त्यांना आत प्रवेश दिला जाईल.त्यांनतर शारीरिक चाचणीमध्ये पुरुषाच्या १०० मीटर,१६०० मीटर व महिलांची १००,८०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल.

जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर उमेदवारांना स्पोर्ट शूज वापरण्यास मुभा देण्यात येईल.पोलिस भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी; यासाठी RFID पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होणार असून उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडता स्वतः गुणवत्ता सिद्ध करीत या प्रक्रियेत सहभाग घ्यावा; असे आवाहन मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रियेत उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करणार नाही; असे हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेतले जाणार आहे.या आदेशाचे पालन न केल्यास उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.भरती प्रक्रियेसाठी काही उमेदवार १ किंवा २ दिवसापूर्वी दाखल होतात.त्यांना उघड्यावर कुठेही रहावे लागू नये; यासाठी त्यांची व्यवस्था पोलिस मुख्यालय येथील ड्रील शेडमध्ये करण्यात आली आहे.

बाहेरील किंवा इतर कर्मचारी उमेदवारांना पोलिस दलात नोकरी लावून देत असल्याचे आमिष देत असतील तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करावी; असे आवाहन मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.महिनाभर चालणाऱ्या या भरती प्रक्रियेदरम्यान पावसामुळे व्यत्यय आल्यास उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख कळविण्यात येईल; असेही सांगण्यात आले.पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू उपस्थित होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!