Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरकोतवालाचे अपहरण करून हत्या; तिघांना अटक..

कोतवालाचे अपहरण करून हत्या; तिघांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-मागील आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे यांचा मृतदेह काल,रविवारी सडलेल्या अवस्थेत उमा नदीच्या तिरावर आढळला.शेतीच्या वादातून त्यांचे अपहरण करून कट करून हत्या करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी नामदेव धनविजय,धनविजय यांचे मानसपुत्र सोपान जिल्हारे समुद्रपूर,प्रशांत कुंभरे याला अटक केली आहे.सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे हे १२ सप्टेंबरपासून बेपत्ता होते.१३ सप्टेंबरला त्यांचे भाऊ संजय खोब्रागडे यांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती.तेव्हापासून ठाणेदार विजय राठोड यांच्या नेतृत्वातील चमू नंदकिशोर खोब्रागडे यांचा शोध घेत होती.दरम्यान,रविवारी सकाळी १०:३० वाजता कुजलेल्या अवस्थेत नंदकिशोरचा मृतदेहच आढळला.पोलिसांनी नामदेव धनविजय,सोपान जिल्हारे,प्रशांत कुंभरे यांना अटक केली.फरार आरोपीचा शोध सुरू आहे.ही कारवाई उपविभागीय पोलिस निरीक्षक दिनकर ठोंबरे,पोलिस निरीक्षक विजय राठोड,सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश मेश्राम,दर्शन लाटकर आदींनी केली.
सन २०१७ ला धनविजय यांनी पॅरे मोहन यांची साडेचार एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली होती; परंतु, त्यांची विक्रीपत्र वगैरे काहीही झाले नव्हते.सन २०२१ मध्ये कोतवाल नंदकिशोर यांनी ती शेती खरेदी करून विक्रीपत्रही तयार केले होते.या कारणातून दोघांमध्ये वाद सुरू होता.त्यातूनच धनविजयने नंदकिशोरला संपवण्याचा कट रचला.त्यासाठी त्याने समुद्रपूर येथील आपला मानसपुत्र सोपान जिल्हारे याला बोलावले.त्याने आपला मित्र प्रशांत कुंभरे व अन्य एकाला बोलावले.त्यांनी रेतीच्या बहाण्याने नंदकिशोरला घरून नेले.त्याला दोन बारमध्ये मद्यधुंद होईपर्यंत दारू पाजली.त्यानंतर उमा नदीच्या काठावरून त्याला ढकलले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!