Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजकृषी पंपांना २४ तास वीज पुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक - कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर...

कृषी पंपांना २४ तास वीज पुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक – कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा व जेल भरो आंदोलन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यातील शंकरपूर व परिसरातील शेतकरी बांधवांनी कृषी पंपांना २४ तास वीज पुरवठ्यासाठी आज १६ मार्च २०२३ रोजी कनिष्ठ अभियंता उपकेंद्र शंकरपूर कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा व जेल भरो आंदोलन करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आक्रमक पावित्रा घेत देसाईगंज येथील महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत उर्जा विभागाचेव्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या निवेदनातुन २४ तास वीज पुरवठा करण्याची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले.

 आंदोलना दरम्यान येथील शेतकऱ्यांनी एकुणच शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करत २४ तास वीज पुरवठ्यासाठी आग्रही असलेल्या आमदारांनी सत्तेत येताच शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडले असल्याने येत्या निवडणुकांत तालुक्याच्या कोणत्याही गावात प्रचार करू न देण्याचा एकमताने निर्णय घेत ‘जो किसान की बात करेगा,वही देश पे राज करेगा’ च्या जोरदार घोषणा देत परिसरातील हजारो संख्येच्या सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शंकरपुर स्थित महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन केले.

दरम्यान आंदोलन हिंसक वळण घेणार नाही याची दक्षता घेत देसाईगंज पोलिसांनी शेकडो आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले होते. यात प्रामुख्याने जेष्ठ नेते परसराम टिकले,सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके,नंदु नरोटे,पिंकु बावणे,नितीन राऊत,वामन सावसाकडे, गजानन सेलोटे,विलास बन्सोड,विलास ढोरे,होमराज हारगुळे,नरेशलिंगायत, विनायक वाघाडे,जगदीश शेंद्रे,मनोज ढोरे,अभय नाकाडे,महेश भरणे,अभय बुद्धे,आशिष गभने,युवराज गभणे,चक्रधर नाकाडे,बालु दुनेदार,यादव बन्सोड,संदिप वाघाडे,उमाशंकर हारगुळे,गणेश वारगुळे आदी शेतकऱ्यांना देसाईगंज पोलिसांनी स्थानबद्ध करून अटी व शर्थिच्या अधिन राहुन सोडले.तथापी शेतकऱ्यांची मागणी पुर्ण करण्याकडे दुल॔क्ष करून तोंडाला पाने पुसल्या गेले असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत येत्या तीन दिवसाच्या आत मागणी मान्य करून किमान १६ तास वीज पुरवठा करण्यात न आल्यास देसाईगंज येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालया समोर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!