Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजकृषीपंप धारकांना २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत करा - देसाईगंज तालुका काँग्रेस...

कृषीपंप धारकांना २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत करा – देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन सादर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांना नियमित २४ तास विद्युत पुरवठा करण्याबाबत देसाईगंज तहसीलदार यांच्यामार्फतीन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.देसाईगंज तालुक्यातील नागरिकांची उपजीविका धान पिकावर अवलंबून असून मागील वर्षाच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधा भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली आहे.शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठ्याची अत्यंत गरज असतांना महावितरण कंपनीने ८ तास विद्युत पुरवठा केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान पीक नष्ट होण्याची शक्यता बळावली आहे.तालुक्यातील कृषी पंपांना २४ तास नियमित वीज पुरवठा तात्काळ करण्यात यावा; असे निवेदन सादर करण्यात आले.  

निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,तालुका उपाध्यक्ष संजय करांकर,पोटगाव गावचे माजी उपसरपंच नरेंद्र गजपुरे,तालुका महासचिव मनोहर नीमजे,ओबीसी तालुकाध्यक्ष अरुण कुंभलवार,तालुका युवक काँग्रेस कमिटी देसाईगंज अध्यक्ष पंकज चहांदे,जिल्ह्याचे ओबीसी काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव मनोज ढोरे,देसाईगंज तालुका सचिव जगदीश शेंद्रे,तालुका सचिव महेंद्र खरकाटे,तालुका सहसचिव अतुल मेश्राम,सागर बनसोड,धनदेव सोनबावणे व तालुक्यातील मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!