- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सुरू असलेल्या नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात कडाक्याच्या थंडीने सर्वत्र हुळहुळी भरून तापमानाचा नीचांकी आकडा ६ ते ७ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.अश्यातच आता दोन दिवसांपासून नीचांकी तापमान १० अंश सेल्सिअसवर पोहचल्याने महाराष्ट्र राज्यात थंडीचा गारठा कमी राहणार असून पुढील २४ तासांमध्ये थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे.दुपारच्या वेळी उष्मा अधिक जाणवेल,तर राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये उष्णतेचे प्रमाण अधिक जाणवेल व हवा दमट असेल.अचानक होणाऱ्या या बदलांचे परिणाम थेट आरोग्यावर होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. अचानक होणाऱ्या बदलांमुळे सर्दी,खोकला तसेच उष्माघातासारखी स्थिती उदभवण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये असणारा शीतलहरींचा प्रभाव कमी झाला असून,मैदानी क्षेत्रांमध्ये कमाल तापमानात वाढ झाली आहे.तर, पर्वतीय भागांवरही हिमवर्षावाने विश्रांती घेतल्याने थंडी काही काळासाठी सुट्टीवर गेल्याचे चित्र आहे.
हवामानाच्या या बदलांचा परिणाम महाराष्ट्रावरही होतांना दिसून येत आहे.राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होतांना दिसत आहे.देशभरात सध्या धुके आणि धुरक्याचे प्रमाण अधिक असून दृश्यमानतेवर त्याचा थेट परिणाम होतांना दिसत आहे. तर,दक्षिण भारतामध्ये पावसाचीच हजेरी कायम असल्याने तापमानात बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या हवा कोरडी राहणार असून उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे.
- Advertisement -

