- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-ग्रामपंचायतीच्या मालमत्ता कराचा भरणा विहित मुदतीत न केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४-१ (ह)नुसार चार ग्रामपंचायत सदस्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.प्रकरणी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाचे अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी पवनी तालुक्याच्या अड्याळ ग्रामपंचायतीचे आशिक नैतामे, देविदास नगरे,पुष्पमाला कोहाड,रुबिना सैय्यद या चार ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र घोषित केले आहे.अपात्र ठरलेल्या चारही सदस्यांना मालमत्ता कराचा भरणा करण्याकरीता ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार नोटिसा बजावल्या होत्या.मागील वर्षाच्या पहिल्यांदा १३ ऑगस्ट २०२४,नंतर २० सप्टेंबर,११ ऑक्टोबर आणि २८ डिसेंबर २०२४ मध्ये कराचा भरणा करा म्हणून मासिक सभेतही सूचना देण्यात आली होती.परंतु त्यांनी कर भरण्यात तीन महिन्यांच्या मुदतीत कसूर केला.याप्रकरणी विजय सोमाजी डंभारे यांनी ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेसाठी चार सदस्यांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार,तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४-१ (ह) चे उल्लंघन केल्याने चारही जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
- Advertisement -

