Monday, August 31, 2026
Homeनागपूरएकाच महिन्यात दुसऱ्यांदा नागपूर विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी…

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा नागपूर विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा बॉम्बने उडविणार असल्याच्या धमकीचा ईमेल आला आहे.या धमकीमुळे आज,मंगळवार ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढून कसून तपासणी केली गेली. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एएआयला पुन्हा बॉम्बची धमकी मिळाल्याने ही खळबळ माजली.

हा ईमेल प्राप्त झाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली असून,ये-जा करणाऱ्या प्रवाशांची, सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.क्यूआरटी,बीडीएस यंत्रणा २४ तास अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

गेले काही दिवसात नागपूरसह देशातील इतरही विमानतळांना उडविण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.अशा प्रकारचा ईमेल प्राप्त होण्याची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे.यापूर्वी देखील देशातील ४० विमानतळांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.या धमकीनंतर सर्व एअर पोर्टसवर सिक्युरिटी अलर्ट दिला गेला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!