- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज-वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या क्षेत्रातील करण्यात आलेल्या विकास कामांविषयीची माहिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी देसाईगंज-वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक वरुण बी.आर.यांना वारंवार मागणी करूनही दिली नाही.उलट ‘आमदारचे सांगण्यावरुन आम्ही माहिती देत नाही’ असे वक्तव्य करून माहिती देण्याचे टाळल्याने आमदार मसराम यांनी आज, बुधवार ५ मार्चला राज्याचे विधानसभाध्यक्ष यांना
महाराष्ट्र विधानसभा नियम २७३ अन्वये विशेष हक्कभंगाची सूचना अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे.
आमदार मसराम यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की,
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा संघात बराच भाग हा वन विभागाचा असून वनपरिक्षेत्र अंतर्गत सन २०२२ पासून झालेल्या विकास कामांमध्ये अनियमितता आढळून आल्याचे निदर्शनास आले असता,सदर विकास कामे ही उपवनसंरक्षक वरुण बी.आर.यांनी एकाच कंत्राटदाराला हाताशी धरुन केल्याचे उघड झाले आहे.यामध्ये बराच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार संशय निर्माण करत असून मी स्वतः त्या बाबतची संपूर्ण लेखी माहिती मागितली असूनसुध्दा अजूनपर्यंत मला कुठलीही माहिती मिळालेली नाही.त्यामुळे मी अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरुन वारंवार माहिती पाठवण्यास सांगितले असता ‘आमदारचे सांगण्यावरुन आम्ही माहिती देत नाही’, असे उध्दटपणे उत्तर या अधिकाऱ्याकडून देण्यात आले.तसेच वार्षिक जिल्हा योजनेमध्ये प्रस्तावित केलेली कामे श्री.वरुण यांनी न घेता माझे पत्राला केराची टोपली दाखवली आहे.या सर्वप्रकारामुळे स्थानिक लोकप्रतिनिधीचा जाणीवपूर्वक सर्वोच्च सभागृहातील सदस्याचे अपमान होत असल्याने उपवनसंरक्षक वरुण बी.आर.व संबंधित अधिकाऱ्यांवर विशेष हक्क भंगाची सूचना देत असून या अधिकाऱ्यांवर विशेष हक्क भंगाच्या कारवाईची मागणी मसराम यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेकडे केली आहे.
- Advertisement -

