उद्रेक न्युज वृत्त :-नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत करण्यात आलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)२०२६ पासून दहावी बोर्डाची परीक्षा ही दोन सत्रांत म्हणजेच वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना मान्यता दिली आहे.या संदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी माहिती दिली आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य आहे.पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये तर दुसरा टप्पा मे महिन्यात असणार आहे.असे असले तरी अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच केले जाईल. अश्यातच काही विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात कमी गुण मिळाले तर दुसऱ्या टप्प्यात गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे.त्याचप्रमाणे दोन्ही टप्प्यातील परीक्षांचे निकाल हे एप्रिल आणि जून मध्ये जाहीर करण्यात येणार आहेत.
आता दहावी बोर्डाची परीक्षा होणार दोन सत्रांत..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

