Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरआता अदानी समूह चालवणार चंद्रपुरातील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा... -...

आता अदानी समूह चालवणार चंद्रपुरातील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा… – अदानी समूहाकडून आता महाराष्ट्र बाराखडी लिहिणार- अंबादास दानवे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या घुग्घूस शहरातील एसीसी सिमेंट उद्योगामार्फत चालविली जाणारी माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा आता अदानी समूहामार्फत चालविली जाणार आहे.नुकतेच या शाळेचे हस्तांतर अदानी समूहाला करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे.दरम्यान, वर्षभरापूर्वीच एसीसी सिमेंट उद्योग अदानी समूहाला हस्तांतरित झाला आहे. आता विरोधकांनी या निर्णयावरून सरकारवर टीका सुरू केल्याने अदानी समूह पुन्हा चर्चेत आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरात अनेक वर्षांपासून एसीसीसी सिमेंट उद्योग कार्यरत आहे.या उद्योगातील कामगारांच्या पाल्यांकरिता माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा चालविली जात होती.या शाळेमध्ये कामगारांची मुले शिक्षण घेत असताना आता ही शाळा अदानी फाऊंडेशनकडे शासनाने हस्तांतरित केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने २७ सप्टेंबरला हस्तांतरासंदर्भात एक शासन निर्णय जाहीर केला आहे.या निर्णयानुसार आता एसीसीऐवजी अदानी समूह माऊंट कार्मेल शाळा चालविणार आहे.
अदानी समूहाकडून आता महाराष्ट्र बाराखडी लिहिणार- अंबादास दानवे👇
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांनी एक्स पोस्टवर जोरदार टीका केली आहे.प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे की,देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्र सरकारवर आज अदानी समूहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे.जमीन, उद्योग कमी होते; ते आता शाळा देखील महायुतीचे सरकार अदानीच्या ताब्यात देत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!