Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरअबब...! शाळा सुरू असतांनाच शाळेत शिरला चितळ

अबब…! शाळा सुरू असतांनाच शाळेत शिरला चितळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना अलीकडे वाढत आहेत.अशातच सिंदेवाही तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात चितळ शिरल्याची घटना घडली. यावेळी शाळा सुरू होती.शाळेतील विद्यार्थी व शिक्षक पवन मोहुर्ले उपस्थित होते.चितळ शाळेच्या आवारात शिरल्याने खळबळ उडाली.ही घटना समजताच शाळेच्या आवारात मोठी गर्दी झाली होती.या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली.

दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चितळला पकडून जंगलात सोडले. वनविभागाला माहिती दिल्यानंतर रेस्क्यू टिम आणि मानव वन्यजीव रक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले.यावेळी त्यांना चितळ ग्रामस्थांनी सुरक्षित ठेवल्याचे दिसले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने या चितळला सुरक्षित जंगलात सोडले.मानवी वस्तीत चितळ येण्याची घटना दुर्मिळ असली तरी पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असण्याची शक्यता आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!