Friday, July 17, 2026
Homeभंडाराअन् संतप्त लाडक्या बहिणींनी अडवला महामार्ग; दोन महिन्याचा लाभ मिळालाच नाही..!

अन् संतप्त लाडक्या बहिणींनी अडवला महामार्ग; दोन महिन्याचा लाभ मिळालाच नाही..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे  नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे लाभ पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.मात्र, राज्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन पैकी एकाही महिन्याची रक्कम जमा जमा झालेली  नाही. यामुळे ज्या महिलांना लाभ मिळाला नाही; अश्या महिलांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. अश्यातच आज,शनिवार १७ जानेवारी रोजी भंडारा जिल्ह्यातील महिलांनी संताप व्यक्त करून संतप्त लाडक्या बहिणींनी चक्क भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत ठिय्या आंदोलन केले.यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबून ठप्प झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. अचानक झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांसह खासगी वाहनेही अडकून पडली होती.आंदोलन करणाऱ्या महिलांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे खात्यात कां जमा झाले नाहीत? असा थेट सवाल  उपस्थित केला.महानगरपालिका निवडणुकीआधी दोन महिन्यांचे मानधन एकाचवेळी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते,मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही,अशी ओरड महिलांनी केली.महिलांनी महामार्ग रोखल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.प्रशासनाच्या आश्वासनानंतर आणि समजावणी केल्यानंतर अखेर महिलांनी आंदोलन मागे घेतले.त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!