Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरअज्ञात वाहनाची धडक; अस्वलाचा मृत्यू..

अज्ञात वाहनाची धडक; अस्वलाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना कोंढाळी-अमरावती महामार्गावरील जुनापाणी गावानजीक पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.मृत अस्वल हे मादी असून,अंदाजे १२ वर्षे वयाचे असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. कोंढाळीपासून १२ किलोमिटर अंतरावरील जुनापाणी गावानजीक रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाला.याबाबत माहिती मिळताच कोंढाळी वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक राजेश सूर्यवंशी,खापरी बिटचे वनरक्षक चन्ने,वनरक्षक नगीना मेश्राम,वनमजूर किशोर कुसळकर,पुंडलिक सरोदे आदी तातडीने घटनास्थळी पोहोचले.मृत अस्वलाचा पंचनामा करून,मृतदेह शविच्छेदनासाठी नागपूर येथील वनविभागाच्या सेमिनरी हिल्स रेस्क्यू सेंटर येथे पाठविण्यात आला.नागपूर-अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात कोंढाळी भागातील संरक्षित वनात वृक्ष कटाई करून नुकसान करण्यात आले. शिवाय,मार्गाचे चौपदरीकरण करतांना वन्यप्राण्यांसाठी कोणतेही अंडरपास बांधण्यात आले नाही,त्यामुळे महामार्गावर वाघ,बिबट,अस्वल,नीलगाय आदी वन्यप्राण्यांचा वाहनाच्या धडकेने सतत मृत्यू होत आहे.यावर वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!