Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजअखेर माहिती मागविणाऱ्या अर्जदारास उर्वरित रक्कम केली परत.. -माहिती अधिकारातील माहितीचे ३...

अखेर माहिती मागविणाऱ्या अर्जदारास उर्वरित रक्कम केली परत.. -माहिती अधिकारातील माहितीचे ३ हजार भरणा केल्यावर सांगितले होते ५५० रुपये; शिवराजपुर गट ग्रामपंचायतीतील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर गट ग्रामपंचायतीत एका माहिती अधिकार अर्ज प्रकरणात जनमाहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक)यांचा अजब-गजब कारनामा उघडकीस आला होता.शिवराजपुर गट ग्रामपंचायतीत कार्यरत असणाऱ्या महिला ग्रामसेविका विद्या मैंद यांनी माहितीच्या अधिकारात अर्जदाराने मागितलेली माहिती न देता सुरुवातीला मागितलेल्या माहितीच्या छायांकित प्रतीसाठी १५०० पानाचे,२ रुपये प्रती पान प्रमाणे ३ हजार रुपये भरणा करण्यास सांगितले होते.त्यानुसार अर्जदाराने ग्रामपंचायतीच्या सामान्य पावतीद्वारे म्हणजेच जनरल फंडामध्ये ३ हजार रुपये रकमेचा भरणा केला होता. त्यानंतर जनमाहिती अधिकारी असणाऱ्या विद्या मैंद यांनी अनवधानाने जादा रक्कम भरणा करण्यास सुचविण्यात आल्याचे कारण देत मागितलेल्या माहितीचे केवळ ५५० रुपये होतात म्हणून भरणा केलेली अत्तिरिक्त रक्कम परत घेऊन जावे,असे अर्जदारास कळवील्याने माहिती न देता भलताच कारभार दिसून आला होता.प्रकरणी माहिती अर्जदार सीताराम रामचंद्र सयाम यांना धक्काच बसलाच होता. अश्यातच आज,गुरुवार २२ मे रोजी माहिती अर्जदार सयाम यांना भरणा केलेल्या ३ हजार रुपये रकमेतून माहिती अर्जातील दस्तऐवजांची ५५० रुपये रक्कम कपात करून उर्वरित रक्कम २ हजार ४५० रुपये धनादेशाद्वारे परत करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?👇
सीताराम सयाम यांनी देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर गट ग्रामपंचायत येथे माहितीच्या अधिकारात १४ वा वित्त आयोग योजना(जनरल बेसीक ग्रॅन्ट)अंतर्गत झालेल्या सर्व कामाची माहिती दिनांक-१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० पर्यंत तसेच निविदा सूचना,एम.बी.व ईस्टीमेटची (अंदाजपत्रक) छायांकित प्रत इत्यादी माहिती माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून माहिती मागितली होती. अर्जदार हा बीपीएलधारक नसल्याने त्याला सुरुवातीला १५०० पानांचे ३ हजार रुपये भरणा करण्यास सांगण्यात आले होते.रक्कम भरणा केल्यानंतर तेवढी रक्कम होत नसून २७५ पानांचे ५५० रुपये होतात.असे कळविल्याने माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली करून यातून पळवाटा शोधण्याचा प्रकार स्पष्टपणे दिसून आला होता. प्रकरणी या अजब-गजब कारणाम्याने माहिती अधिकार कायद्याचा फज्जा उडविण्यात आला होता. अश्यातच आता उर्वरित रक्कम तर परत करण्यात आली.मात्र,दिलेली माहिती मागितलेल्या माहिती प्रमाणे आहे की काय? याची तपासणी करणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!