Wednesday, August 5, 2026
Homeनवी दिल्लीसर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती गॅसच्या किंमितीत वाढ; उद्यापासून नवे दर लागू...

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती गॅसच्या किंमितीत वाढ; उद्यापासून नवे दर लागू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-विधानसभा निवडणूक  कालावधीपासून आतापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडर दराच्या किंमतीत सातत्याने कमी-जास्त वाढ होत होती.महिन्याच्या १ तारखेला कंपन्यांकडून गॅस सिलेंडरचे दर ठरविण्यात येतात. अशातच आता घरगुती गॅस वापरणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज,सोमवार ७ एप्रिलला निर्णय जारी करीत केंद्र सरकारच्या एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. एलपीजी सिलेंडरच्या घरगुती गॅस वापराच्या १४.२ किलो दरात ५० रुपयांची वाढ केली आहे.सदरचा निर्णय हा उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस वापरकर्त्यांनाही लागू असणार आहे.सदरचे दर हे उद्या म्हणेजच मंगळवार ८ एप्रिल पासून लागू होणार आहेत.त्यामुळे उद्यापासून ५० रुपये अधिक किंमतीला गॅस सिलेंडर सर्वांना विकत घ्यावा लागणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच्या सिलेंडरची किंमत ही ५०० रुपयांवरून ५५० रुपये झाली आहे.तर इतर ग्राहकांसाठी सिलेंडरची किंमत ८०३ रुपयांवरून वाढून ८५३ रुपये झाली आहे.सदरच्या किंमती ह्या त्या-त्या स्थानिक क्षेत्रानुसार असणार आहेत.सरकारच्या या निर्णयामुळे गृहिणींचे बजेट बिघडणार आहे.घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यासोबतच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क वाढवले.शुल्कात २ रुपये लीटर इतकी वाढ केली.मात्र,यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत.हा खर्च पेट्रोलियम कंपन्या करतील.पेट्रोल डिझेलवर वाढवण्यात आलेल्या उत्पादक शुल्काचा उद्देश हा ग्राहकांवर ओझे टाकण्याचा नाही,असेही मंत्री पुरी यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!