Tuesday, July 28, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय....असेही एक दुकान 'त्यांना' ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे 'फलक' लावावे...

संपादकीय….असेही एक दुकान ‘त्यांना’ ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे ‘फलक’ लावावे लागते……-अन् चोरांचे पोटही भरावे लागते….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादकीय

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

उद्रेक न्युज वृत्त:- आपण सर्वच जण अचंभित झाले असालाच; की असे कोणते दुकान वा व्यवसाय आहे की,कुणाला ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे फलक(बोर्ड) लावावे लागते.अशातच कमाईचे साधन म्हणजे निव्वळ पैसाच-पैसा व आरामदायक जीवन जगणे तर आहेच; अशातही अश्या दुकानाच्या वा व्यवसायाच्या माध्यमातून तितकाच धोका व चोरांचेही पोट भरावे लागते.हेही तितकेच महत्त्वाचे आहे.आता आम्ही आपणांस सांगू इच्छितो की,असे कोणते दुकान वा व्यवसाय आहे तर,एक म्हणजे इमाने-इतबारे सुरू असलेला अवैध धंदा म्हणजे सट्टा-पट्टीचा व्यवसाय व दुसरा जोमाने व तितक्याच ताकदीने सर्वत्र- सगळीकडेच सुरू असलेला अवैध धंदा म्हणजे अवैध दारू विक्रीचा व्यवसाय होय.अशातच सध्याच्या घडीला आणखी एका अवैध धंद्याची भर पडलेली दिसून येत आहे.ती म्हणजे अवैध रेतीचा उपसा करून शासनास करोडो रुपयांचा चुना लावल्या जात आहे. आता आपण वळूया मुख्य बाबींकडे,एखाद्या इसमाने अवैध दारू विक्रीचा धंदा वा व्यवसाय सुरू केल्यास; अशा इसमांना कुणालाही आवाज देण्याची गरजच भासत नाही.एकदा धंदा सुरू केला म्हणजे ‘गंदा है पर धंदा है’ अशी किमयाच सुरू होते.एखाद्या तळीरामास एकदा माहीत झाले की,अमुक व्यक्तीकडे गावठी,देशी, विदेशी व थंडी बीयर मिळतेय तर ‘संगत मे पंगत’ असे होऊन डोलारे सुरू होतांना दिसून येतात.त्यामुळे अशा धंद्यासाठी ना भाड्याची खोली लागते; ना कुणाला आवाज द्यावे लागते; ना दुकानाचे नाव लिहावे लागते.

मात्र याला अपवाद म्हणजे परवानाधारक दुकाने आहेत.अवैध दारू विक्री धंद्यांचा भडिमार सुरू असण्याचे मुख्य कारण म्हणजे आरामदायक जीवन, झटपट पैसा,तगडी कमाई व सोयी-सुविधायुक्त जीवनशैली तसेच ‘ना बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या’ हे आहे.सध्या स्थितीत काही शहरात तसेच ग्रामीण भागातील गावोगावी काही अंतरावरच अवैध दारू विक्रीच्या धंद्यांनी संसार थाटला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.काही गावांमध्ये कोणती दारू मिळतेय म्हणण्यापेक्षा ‘ती’ दारू याठीकाणी आणा; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.परंतु जितकी सोयी-सुविधायुक्त जीवनशैली अशा धंद्यात आहे; तितकीच जोखीम व चोरांचे पोटही भरावे लागते.त्यामुळे अवैध दारूचे धंदे फोफावली आहेत.इमाने-इतबारे असलेला अवैध धंदा म्हणजे कागदावरचा चीटोरा; एका चीटोऱ्याला आज इतके महत्व प्राप्त झाले आहे की,दोन अंकी नाटक फसले तर समोरच्या व्यक्तीस रक्कम ही द्यावीच लागते व अशी रक्कम दिल्याशिवाय कुठलाही पर्यायच नसतो.नाहीतर मंदी आणि चालक-वाहक यांच्यावर बंदी झाल्याशिवाय राहणार नाही.यासाठीही ‘त्यांना’ ना आवाज द्यावा लागतो; ना दुकानाचे ‘फलक’ लावावे लागते; हे तितकेच महत्त्वाचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!