Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविसाव्यासाठी बसथांब्याजवळ थांबलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; राज्यातील पहिला बळी..

विसाव्यासाठी बसथांब्याजवळ थांबलेल्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; राज्यातील पहिला बळी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाचा तडाखा कमी-जास्त जरी असला तरीही,काही भागात उष्णतेची लाट उसळू लागली आहे.उन्हात गेल्यानंतर जीव कासावीस होऊन शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. अशातच भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वेळोवेळी उष्णतेच्या लाटे बाबत माहिती देण्यात येत असतांनाच काल,बुधवारी २६ मार्चला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील निमखेडी बसथांब्याजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या अमोल दामोदर बावस्कर वय २५ वर्षे या तरुणाचा उष्माघाताने अचानक मृत्यू झाला असून उष्माघाताचा हा राज्यातील पहिला बळी ठरला आहे. दरम्यान, उष्माघाताचा धोका वाढत चालल्याने राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.उन्हात बाहेर पडतांना नागरिकांनी दक्षता घ्यावी,उन्हात विशेषतः दुपारी १२ ते ३ या काळात बाहेर जाणे टाळावे,असे आवाहन करण्यात आले आहे.उद्या,शुक्रवार २८ मार्चला पासून तापमान थेट ३ अंशांनी वाढणार असून, पुढील दोन दिवस शुक्रवारी आणि शनिवारी पारा थेट चाळीशीच्या घरात जाईल. आठवडाभरातील हे सर्वाधिक कमाल तापमान असेल.रविवारी पारा ३५ अंश सेल्सिअस येईल. आठवड्यात तापमानात होणारी वाढ पाहता मार्च महिन्याचा शेवट कडक उन्हाच्या तडाख्याने होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविला असून नागरिकांनी अकारण उन्हा-तान्हात फिरू नये व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!