- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्यासह वाघांनी नागपूर जिल्ह्याच्या कुही आणि पारशिवनी तालुक्यातील दुर्गम भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.वाघाने २० दिवसांत जनावरे व माणसांवर हल्ले करून शिकारी केल्या आहेत. काल शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील उमरझरी शेत शिवारात मिरची तोडत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली.तर इकडे वाघाने कुही तालुक्याच्या वेलतूर-प्रतापपूर शिवारातील शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना सकाळी उघडकीस आली,तर पारशिवनी तालुक्यातील चिंचभवन शिवारात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वाघाने दोन गायींवर झडप घालत गंभीर जखमी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.निर्मला श्रीपत गभणे वय ५८ वर्षे,रा.वेलतूर,ता.कुही,जि.नागपूर असे मृत महिलेचे नाव आहे.
वेलतूर-प्रतापपूर जंगल शिवारात गभणे कुटुंबाची
शेतजमीन आहे.निर्मला शुक्रवारी शेतावर कामानिमित्ताने गेली होती.सायंकाळ होऊनही घरी परत न आल्याने कुटुंबातील लोकांनी शोधाशोध केली असता ती मिळाली नाही.मात्र त्या शिवारात वाघ दिसल्याची माहिती वनविभागाला व वेलतूर पोलिसांना देण्यात आली. रात्रीच्या वेळी अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता परिसरात वाघ दिसून आला.त्यावरून सदर महिलेची शिकार वाघाने केली असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात आला.शनिवारी सकाळी अधिकारी व नातेवाईक शिवारात गेले असता पुन्हा वाघ दिसला. वाघाने निर्मला गभणेची शिकार केल्याचे स्पष्ट झाले. वनकर्मचारी यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कुही येथे पाठविला.
दुसऱ्या घटनेत पारशिवनी तालुक्यातील चिंचभवन शिवारात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने दोन गायींवर झडप घालत त्यांना गंभीर जखमी केले. चिंचभवन येथील शेतकरी रमेश भोंडे हे त्यांच्या पाळीव जनावरांना नेहमीप्रमाणे शिवारात चराईसाठी घेऊन गेले होते.यावेळी सायंकाळच्या सुमारास झुडपात लपून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला.या हल्ल्यात दोन गायी गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर वाघाने रमेश भोंडे यांच्याकडेही वळण्याचा प्रयत्न केला.मात्र,त्यांनी प्रसंगावधान राखत हातातील काठी व सोबत असलेल्या कुत्र्याच्या मदतीने स्वतःचा बचाव केला.त्यांच्या आरडाओरडीनंतर आसपासचे शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.
- Advertisement -

