Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमारले जाण्याच्या भीतीने १५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

मारले जाण्याच्या भीतीने १५ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षकांच्या वाढत्या कारवायांमुळे नक्षलवादी धास्तावले असून मारले जाण्याच्या भीतीने आज,बुधवार २६ मार्च रोजी
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ९ तर दंतेवाडात ६ नक्षलींनी सुरक्षा दलांपुढे आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या १५ ही नक्षलवाद्यांवर शासनाने नक्षली बंडू मलकावर ८ लाख तर यातील काहींवर ५ लाख व २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.त्यामुळे नक्षली मरण्यापेक्षा शरणागती बरी,असा पावित्रा घेऊ लागले आहेत.छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ‘पूना नर्कोम’ तर दंतेवाडा जिल्ह्यात ‘लोन वर्राटू’ नावाने नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा पथकांची मोहीम सुरू आहे.अशातच आत्मसमर्पण केलेल्या ९ नक्षलवाद्यांवर एकूण २६ लाख रुपये तर ६ नक्षलवाद्यांवर एकूण १३ लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते.दंतेवाडात आत्मसमर्पण केलेल्या नक्षालींमध्ये दोन महिला व चार पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!