- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात काळजाचा ठेका चुकवणारी घटना काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.मागील वर्षी ३ वर्षीय मुलगा पाण्यात बुडून मृत पावला; तर आता अपघातात वडील गेले असल्याची घटना चिमूर तालुक्यातील गोंदेडा-केवडा मार्गावर घडली.रोहन चंदूलाल आत्राम हा काल गुरुवारच्या रात्री अपघातात मृत पावला तर मागील वर्षी त्याचा ३ वर्षीय मुलगा पाण्यात बुडून मृत्यू पावला असल्याने आत्राम कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.त्यातच रोहनला दीड वर्षाची मुलगी आहे.
माहितीनुसार,गोंदेडा-केवडा मार्गावर पुलाचे बांधकाम सुरू आहे.२९ वर्षीय रोहन चंदूलाल आत्राम रा.गोंदेडा व ३७ वर्षीय प्रमोद संतोष धारणे हे दोघेही रात्री ८ वाजेच्या सुमारास केवडा येथून कामे आटोपून गोंदेडा
गावाकडे परत जात होते.अशातच रात्री साडेआठच्या सुमारास पुलाजवळ आल्यानंतर पुलाचे बांधकाम लक्षात न आल्याने भरधाव दुचाकी पुलावर आदळून दोघे गंभीर जखमी झाले.जखमींना पुढील उपचाराकरिता चिमूर येथे नेत असतांना वाटेतच २९ वर्षीय रोहन आत्रामचा मृत्यू झाला.तर सोबती प्रमोद धारणे जखमी झाला.जखमीला पाठीला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.
- Advertisement -