Thursday, April 30, 2026
Homeमुंबईमहायुती सरकार आज मांडणार विश्वासदर्शक ठराव...

महायुती सरकार आज मांडणार विश्वासदर्शक ठराव…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आज सोमवारी ९ डिसेंबरला आपला विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडला जाणार आहे.दरम्यान,येत्या गुरुवार १२ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
२८८ सदस्यांच्या सभागृहात महायुतीकडे तब्बल २३७ आमदारांचे बहुमत आहे.त्यामुळे विश्वासदर्शक ठराव संमत होणे,ही केवळ औपचारिकता राहिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यातील फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.उदय सामंत,दिलीप वळसे पाटील,रवी राणा हे नियम २३ अन्वये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत असल्याचा प्रस्ताव मांडतील.महायुतीकडील भरभक्कम बहुमतामुळे आवाजी मतदानाने हा प्रस्ताव संमत केला जाण्याची शक्यता अधिक आहे.दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तोंडावर असल्याने येत्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!