Tuesday, July 21, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरीच्या इथेनॉल कंपनी विरोधात गावकरी एकवटले..

ब्रम्हपुरीच्या इथेनॉल कंपनी विरोधात गावकरी एकवटले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उदापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या बोरगाव मार्गावरील रामदेव बाबा सॉलवंट कंपनीच्या डिस्टिलेशन प्लांटला बुधवार १९ नोव्हेंबरच्या सायंकाळी टेस्टिंग दरम्यान अचानक भीषण आग लागून मोठा स्फोट झाला होता.आग आणि धुराचे मोठे लोट तसेच उंच उसळणाऱ्या ज्वालांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.आग नियंत्रणात आणण्यासाठी ब्रम्हपुरी,नागभीड,सिंदेवाही व मूल येथील अग्निशमन दल,त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील दोन फायर ब्रिगेड तसेच देसाईगंज येथील पथकानेही तातडीने मदतकार्य सुरू केले.तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या दोन फायर टेंडर फोम सोल्यूशनसह घटनास्थळी रवाना करण्यात आल्याने रात्री ८ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.अश्यातच कंपनीत झालेल्या स्फोटामुळे परिसरातील विशेष करून उदापूर गावातील नागरिक भयभीत होऊन सैरभैर झाले होते.स्फोटाने गाव परिसर दणाणून गेल्याने संतप्त गावकरी २४ नोव्हेंबरला एकत्र येत शेकडो नागरिकांनी इथेनॉल कंपनी परिसरात जाऊन जोरदार नारेबाजी केली. इथेनॉल प्लान्ट जवळ असलेल्या उदापूर येथील ग्रामस्थांना टेस्टिंगचा त्रास सहन करावा लागत आहे.भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने परिसरातील इथेनॉल कंपनी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!