Sunday, May 3, 2026
Homeमुंबईबापरे.! चक्क पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट,चमचे, वाट्या व ग्लास चांदीचे; एका थाळीचे जेवण...

बापरे.! चक्क पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट,चमचे, वाट्या व ग्लास चांदीचे; एका थाळीचे जेवण ४ हजार ५५० रुपये.. – बरं झालं ताटात जेवायला सोने दिले नाहीत- खासदार संजय राऊत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-नुकताच संसद व राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांचा दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा काल मंगळवारी मुंबईत समारोप झाला.संसद व विधिमंडळाची अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते.पण,याच समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या दोन दिवसांच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून त्यावर लाखोंचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.लक्षवेधनारी बाब म्हणजे, काटकसरीवर चर्चा करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट,चमचे,वाट्या व ग्लास हे चक्क चांदीचे होते. पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था निखील केटरर्सकडे होती.यासाठी चांदीची भांडी भाड्याने आणली होती.एका ताटाचे दिवसाचे भाडे ५५० रुपये होते.तर एका थाळीचा दर ४ हजार रुपये होता. विधिमंडळातील अधिकाऱ्यांनीच याची पुष्टी केली आहे.भोजनात कोथिंबीर वडी,मालवणी करी,सुरमई फ्राय,दहीवडे, बटाट्याची भाजी व पुरण पोळी असा माठी मेन्यू होता.एकीकडे राज्य कर्जाच्या खाईत असतांना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते.राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतांना चांदीच्या ताटात जेवण देण्याची काही गरज होती कां? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.तर उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘बरं झालं चांदीच्या ताटात सोने जेवायला दिले नाहीत तर’..अशी टीकेची तोफ डागली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी  नाही,धानाचा बोनस नाही, गरीब,शेतकरी,सामान्य जनतेला त्यांचे हक्काचे पैसे सरकार देत नाही आणि अंदाज समितीच्या बैठकीला येणाऱ्यांसाठी मात्र चांदीच्या ताटात जेवण दिले जाते. सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असतांना राज्यकर्ते उधळपट्टीत लागले,असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!