- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याला गेले तीन महिने झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरुप धारण करणार आहे.जाता-जाता पाऊस धुमाकूळ घालणार आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे.यामुळे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाकडून एनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.मध्य महाराष्ट्र,कोकण या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान,सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी पाणी साचले होते.मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते तसेच अधूनमधून एखादी सर येऊन गेली.विदर्भ,मराठवाडा,कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.मुंबई आणि कोकणातही जोरदार पाऊस कोसळेल. पालघर,ठाणे,धुळे,नंदुरबा र,जळगाव, नाशिक,नगर, पुणे,सांगली,सो लापूर,छत्रपती संभाजीनगर,जालना, लातूर,धाराशीव, अमरावती, बुलढाणा,चंद्रपूर,गडचिरोली, ना गपूर,वर्धा,वाशीम,यवतमाळ या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
- Advertisement -

