Monday, December 15, 2025
Homeगडचिरोलीपीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता हवा असेल तर त्रुटींची पूर्तता करा..

पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता हवा असेल तर त्रुटींची पूर्तता करा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे.मात्र,अनेक शेतकऱ्यांच्या नोंदींमध्ये ई-केवायसी अपूर्ण असणे,बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नसणे,तसेच जमिनीच्या नोंदींची पडताळणी प्रलंबित असणे,अशा विविध त्रुटींमुळे पात्र लाभार्थ्यांना येणाऱ्या २१ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.तरी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी तपासून त्यातील त्रुट्या त्वरित दुरुस्त कराव्यात,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
लाभार्थ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर(CSC) म्हणजेच ऑनलाईन सेतू केंद्रात जाऊन आपली ई-केवायसी पूर्ण करावी.तसेच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असल्याची खात्री करून घ्यावी. संबंधित तहसील कार्यालय,तलाठी किंवा कृषी कार्यालयात संपर्क साधून जमिनीच्या नोंदीतील त्रुटींची पडताळणी करावी.
प्रधानमंत्री किसान पोर्टलवर आता ‘अपडेट मिसिंग’ नावाचा नवीन पर्याय उपलब्ध झाला असून,अपात्र झालेल्या किंवा त्रुटीपूर्ण माहिती असलेल्या लाभार्थ्यांनी सीएससी केंद्रात जाऊन हा पर्याय वापरून आवश्यक माहिती व कागदपत्रे जोडून नोंदी अद्ययावत करावे. योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी नोंदीतील सर्व त्रुटी तातडीने दूर कराव्यात,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे. त्याचप्रमाणे,इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनीही याकडे लक्ष घालून पुढील प्रक्रिया पार पाडावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!