Tuesday, May 26, 2026
Homeचंद्रपूरनियतीने डाव साधला..! नोकरीवर रूजू होण्यासाठी जात असतांना वाटेतच दोन सख्ख्या भावंडांवर...

नियतीने डाव साधला..! नोकरीवर रूजू होण्यासाठी जात असतांना वाटेतच दोन सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील जानाळा येथील दोन सख्ख्या भावंडांवर काळाने झडप घातल्याची दुर्दैवी घटना काल,शुक्रवारी २१ मार्चच्या पहाटेच्या सुमारास मूल-चंद्रपूर मार्गावरील अंधारी नदी पुलाजवळ घडली.शुभम राजू आकुलवार वय २७ वर्षे व करण राजू आकुलवार वय २४ वर्षे,रा.जानाळा ता.मूल,जि.चंद्रपूर अशी मृतक भावंडांची नावे आहेत. करण हा कंत्राटी नोकरीवर रूजू होण्यासाठी भावासोबत नागपूरला जाणार होता.अशातच दोन्ही सख्ख्या भावंडांवर काळाने घाला घातल्याने आकूलवार कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या शुभम व करणच्या मृत्यूने जानाळ्यात शोकळा पसरली आहे.
मोठा भाऊ शुभम आकुलवार हा चंद्रपूर येथील खासगी कंपनीत कंत्राटी नोकरी करीत होता.तर लहान भाऊ करण याचीही नागपुरातील एका खासगी कंपनीत कंत्राटी नोकरीसाठी निवड झाली होती.शुभम हा जानाळा येथून दररोज दुचाकीने कंपनीत कामाला जायचा.करणला काल शुक्रवारी कंपनीत रुजू व्हायचे होते.त्यामुळे नेहमीप्रमाणे शुभम हा करणला सोबत घेऊन दुचाकी क्रमांक-एमएच ३४ यू १९८७ ने  चंद्रपूरकडे निघाला होता.चंद्रपूर बसस्थानकावरून करण हा नागपूरला जाणार होता.मात्र,अंधारी नदी पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.अज्ञात वाहनाची धडक इतकी जोरदार होती की,दोन्ही भावंडे जागीच गतप्राण झाले.
शुभम व करण यांचे वडील राजू आकुलवार हे भूमिहीन आहेत.घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतांनाही त्यांनी मुलांना शिकविले.बहिणीचा विवाह झाला.घरी उदरनिर्वाहाचे काहीही साधन नसल्याने वडील मिळेल ती मजुरी करतात.मोठा शुभम कंपनीत काम करायचा तर करणचीही कंपनीत निवड झाल्याने कुटुंबीय आनंदित होते.मात्र,नियतीने डाव साधल्याने आकुलवार परिवाराच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!