Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदोन हजारांच्या नोटांचा थांग पत्ताच लागेना..!- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार २१४.२०...

दोन हजारांच्या नोटांचा थांग पत्ताच लागेना..!- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार २१४.२० कोटी नोटा चलनात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नोटबंदी जाहीर केली.त्यानुसार चलनातील ५०० व १,००० रुपयांच्या नोटा चलन बाह्य झाल्या व त्यानंतर २,००० हजाराची व इतर नोटा चलनात आल्या.इतर नोटा अजूनही चलनात तर आहेतच; मात्र दोन हजारांची नोट कुठे गायब झाली याचा थांगपत्ताच लागत नसल्याने सदर बाब नवलाची ठरली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२२ रोजीच्या आकडेवारीवरुन, २,००० रुपयांच्या एकूण २१४.२० कोटी नोटा चलनात आहेत. एकूण चलनाचा हा आकडा १.६% आहे.त्यांचे मूल्य ४,२८,३९४ कोटी रुपये आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा असूनही त्या मात्र व्यवहारातून कां गायब झाल्या, हा खरा प्रश्न आहे.

जर कां,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच चलनातील नोटांची जाण नसेल तर जनता-जनार्दन यांनी कुणावर विश्वास ठेवावा? व चलनातील एवढ्या मोठ्या नोटा गेल्या कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.देश हा डॉ. बाबा साहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारावर खरोखरच चालतो की काय? अशी परिस्थिती हल्ली निर्माण झाली आहे.’चलनातील दोन हजारांच्या नोटांनी बांधलाय फेटा’ असे विदारक चित्र दिसून येत आहे.यांस जबाबदार कोण? एकीकडे बँकांची बँक म्हणते की मोठ्या प्रमाणावर नोटा तर आहेत मात्र त्या गायब झाल्या कश्या व कुठे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!