Tuesday, March 18, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तदोन हजारांच्या नोटांचा थांग पत्ताच लागेना..!- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार २१४.२०...
spot_img

दोन हजारांच्या नोटांचा थांग पत्ताच लागेना..!- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार २१४.२० कोटी नोटा चलनात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नोटबंदी जाहीर केली.त्यानुसार चलनातील ५०० व १,००० रुपयांच्या नोटा चलन बाह्य झाल्या व त्यानंतर २,००० हजाराची व इतर नोटा चलनात आल्या.इतर नोटा अजूनही चलनात तर आहेतच; मात्र दोन हजारांची नोट कुठे गायब झाली याचा थांगपत्ताच लागत नसल्याने सदर बाब नवलाची ठरली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालानुसार, ३१ मार्च २०२२ रोजीच्या आकडेवारीवरुन, २,००० रुपयांच्या एकूण २१४.२० कोटी नोटा चलनात आहेत. एकूण चलनाचा हा आकडा १.६% आहे.त्यांचे मूल्य ४,२८,३९४ कोटी रुपये आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा असूनही त्या मात्र व्यवहारातून कां गायब झाल्या, हा खरा प्रश्न आहे.

जर कां,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच चलनातील नोटांची जाण नसेल तर जनता-जनार्दन यांनी कुणावर विश्वास ठेवावा? व चलनातील एवढ्या मोठ्या नोटा गेल्या कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.देश हा डॉ. बाबा साहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारावर खरोखरच चालतो की काय? अशी परिस्थिती हल्ली निर्माण झाली आहे.’चलनातील दोन हजारांच्या नोटांनी बांधलाय फेटा’ असे विदारक चित्र दिसून येत आहे.यांस जबाबदार कोण? एकीकडे बँकांची बँक म्हणते की मोठ्या प्रमाणावर नोटा तर आहेत मात्र त्या गायब झाल्या कश्या व कुठे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षली संघटनेला मोठा हादरा; तब्बल १९ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंसक कारवाया,निष्पाप लोकांचे बळी,नाहक त्रास देणे,आदिवासींचे शोषण करणे तसेच अमानवीय विचारसरणीला झुगारून तब्बल १९ नक्षलवाद्यांनी आज सोमवारी छत्तीसगड राज्याच्या बिजापूरमध्ये पोलीस...

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा घेऊन दोन गटांत हाणामारी; पोलिसांवर तुफान दगडफेक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित...

आता घरकुलधारकांना १५ दिवसांत वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे.महत्वाचे म्हणजे अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडूनच घरचा आहेर दिला जात असल्याचा प्रकार हल्ली विधानसभेत निदर्शनास येऊ लागला...

घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!