Tuesday, May 19, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरील रोजगार हमीच्या कामांना लागले ग्रहण -  जेमतेम बोटावर...

देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरील रोजगार हमीच्या कामांना लागले ग्रहण –  जेमतेम बोटावर मोजण्याइतकीच कामे सुरू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या यंत्रणा स्तरावरील कामांना हल्ली ग्रहण लागले आहे.देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरील कामे जेमतेम बोटावर मोजण्याइतकीच सुरू असल्याने तालुक्यातील संपूर्ण गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी.अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

देसाईगंज तालुक्यातील शिवराजपुर,डोंगरगांव व बोळधा या ठीकाणी यंत्रणा स्तरावरील केवळ तीन ते चारच कामे सुरू असून कोंढाळा,कुरुड,चोप,मोहटोला,आमगाव,गांधीनगर,विसोरा,उसेगाव,कोकडी,तुळशी,पोटगांव,कसारी,अरततोंडी,पिंपळगाव,शंकरपूर व इतर गावांमध्ये यंत्रणेची एकही कामे सुरू नसल्याने मजूर वर्ग रोजगाराच्या शोधात भटकंती करतांना दिसून येत आहेत.रोजगार हमी योजनेची कामे दोन स्तरावर केली जातात.एक यंत्रणा स्तर तर दुसरे पंचायत स्तर; यामध्ये यंत्रणा स्तरावर वन विभाग,इटीयाडोह विभाग,कृषी विभाग,सिंचाई विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग तर पंचायत विभाग स्तरावर ग्रामपंचायतीच्या मार्फतीने रोजगार हमीची कामे गावातील मजुरांदद्वारे केली जातात.मजुरांद्वारे केल्या जाणाऱ्या कामांना अकुशल तर इतर साहित्यांची कामे करून घेण्यास कुशल कामे म्हटले जाते.

यंत्रणा स्तरावर ५० टक्के तर पंचायत स्तरावर ५० टक्के कामे केली जातात.मात्र हल्ली देसाईगंज तालुक्यातील गावांमध्ये अकुशल कामांचा थांगपत्ताच लागत नाही.तालुक्यात एवढी मोठी यंत्रणा असून रोजगार हमीची कामे सुरू कां बरं केली जात नाही?याचे नवल वाटत आहे.शासन स्तरावरून एका वर्षात एका कुटुंबातील सदस्यांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी दिली जाते.मात्र १०० दिवस तर सोडा साधे एका कुटुंबाला साधे ५० दिवस सुध्दा काम दिले जात नाही.यंत्रणा स्तरावर रोजगार हमीची कामे सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे.गेली १० वर्षापूर्वी कुशल प्लस अकुशल मिळून भरपूर कामे केली जायची व गावातील मजुरांना गावातच रोजगार मिळायचा; मात्र अलीकडे कुशलचा निधी चार ते पाच वर्षे मिळत नसल्याने भरपूर प्रमाणात रोजगार हमीची कामे होतांना दिसून येत नाही.डिगीमडागिम केवळ शासनास दाखविण्याकरिता कामे केली जात आहेत.

यामुळेच ‘रोजगाराची हमी,कामाची कमी’ असे झाले असल्याने; याकडे लक्ष घालून तालुक्यातील सर्वच गावात रोजगार हमीची कामे सुरू करून गावातील कुटुंबातील सदस्यांना रोजगार द्यावा;अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!